सीखना अभी बाकी है

दोस्त... तेरे बगैर जीना

सीखना अभी बाकी है
नए पते पे चिठ्ठी तुझे 
लिखना अभी बाकी है।

       कोई पहले जायेगा 
       और दूजे को रहना इधर 
       रहना मगर किस तरह
       सीखना अभी बाकी है ।

चाय नाश्ते पे गपशप 
सुनी सी है सुबह अब 
एक ही कप चाय बनाऊँ
सीखना अभी बाकि है ।

     दुनिया कहे अपनों का गम...
     समय के साथ होता कम 
     समय को मगर कैसे बिताना..
     सीखना अभी बाकी है।

                 पंक्ति

माणुसकी पेरणारी माणसं ...

 आदिवासी क्षेत्रातील "सागटाळा" हे डोंगराच्या कुशीत विसावलेलं 3 वाडयांचं गाव. 

गावाच्या चहू बाजूनी जंगल .आणि हो ...एका वाड्या वरून दुसऱ्या वाड्या वर जायचं तरी जंगलातूनच जावं लागेल..

जंगलातच लोकांची शेती...पिढ्यान पिढ्या कसत असले तरी कागदोपत्राच्या कचाट्यात सापडल्या मुळे लोकांच्या नावावर नसलेली पावसाळी शेती....

शेतात पिकलेले दाणे 6-8 महिने पुरतात आणि नंतर व्होराच्या दुकानातून विकत किंवा उधार...

इकडे गावात व्होरा समाजातील लोकांची दुकानं 

धर्माने मुस्लिम पण व्यापारी वर्ग असल्यामुळे त्यांची इतर धर्मातल्या लोकांशी फार जवळीक ...

गावातील व्होराचं दुकान हे 12 महिने बेधडक शेतातल्या दाण्या पासून, मधापर्यंत, महुडयाच्या फुलांपासून कच्च्या कैऱ्या, चिंचा, डिंक...सगळं विकण्याची आणि खरीदण्याची हमखास जागा...!! 

गावात मीटिंग करत असताना मुलं जमतातच.. काही तर फारच लहानगी आई च्या मांडीवर बसूनच असतात...

मीटिंग चालू होण्यापूर्वी मुलां साठी काहीबाही खाऊ नेण्याची आमची रोजची  सवय.... त्या निमित्ताने काही सकस आहार पोटात जातो... आणि मीटिंग पण 2 तास आरामात करता येते...

एखादा गंभीर प्रश्न चर्चेला असेल तर आमच्यातील एखाद्याने मुलांना बघण्याची भूमीका घ्यायची ..हे ही ठरलेलं...

त्या दिवशी जाताना काही घेऊन जाता आलं नाही ..म्हणून गावातील एकुलत्या एक व्होरा च्या दुकानात शिरले  

गावातील या छोटेखानी दुकानात हमखास मिळणारी वस्तू म्हणजे गूळ, चणे, शेंगदाणे ...मी त्याला ते द्यायला सांगितले तेवढ्यात एक लहानसा मुलगा 5 रुपये घेऊन "बा ए मसालो आलवानु कह्यु स" असं बोलून उभा राहिला..

आसिफभाई (दुकानदार) नी छोट्या पुड्या करून मिरची पावडर, धणे, जिरे, हळद आणि थोडंसं तेलही बांधून दिलं...मुलगा निघून गेला... मी पहातच राहिले ..

आपला देश... लाखो रुपयांची बेग, करोड रुपयांचा ड्रेस घालणाऱ्या लोकांचा ही आणि 5 रुपयात भाजी, आमटीचं सामान नेणाऱ्या आदिवासींचा ही....

मला खिन्न पाहून आसिफभाई म्हणाले," बेन पैसा नथी... पण मोल न करी शकाय ऐवी माणसाईथी भरेला छे आ लोको" 1 रूपियो लई ने आवे तोय सामान आलु हूं.(बेन, गरीब असतील पण माणुसकीच्या खजिन्याची धनी आहेत ही लोकं..5 नव्हे 1 रुपया घेऊन आली ना तरीही देतो मी सामान त्यांना)

आणि मग आसिफ भाईनी संपूर्ण कहाणी सांगितली ...

2002 च्या दंग्या वेळेची कहाणी ...आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकानी होते ..गोधरा आणि त्या नंतर चाललेली दंगल गावात पोचेल असा अंदाज नव्हता... वातावरण तणावग्रस्त असलं तरी गावातील दुकानं उघडत होती... अचानक त्या दिवशी सकाळी 11:30 सुमारास गावात अचानक एक जीप आली.. तलवारी घेऊन उभे राहिलेले युवक.. गावात येऊन त्यांनी युवकांना भडकवायला सुरुवात केली

काढा त्यांना घरा बाहेर ...गावा बाहेर...वेशी बाहेर आणि आमच्या ताब्यात द्या...

आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकान तसंच टाकून पळाले... गावाच्या सीमेवरील जंगलात, शेतात... कुठे जाऊ आणि काय करू असं त्यांना झालं होतं...

तेवढ्यात दुसऱ्या वाड्यावरील आणि गावातील मुसलमान लोकं धावत आली... कुठेतरी शेतात लपली...

थोड्या वेळानं टोळी आली.. कुठे गेले.. बाहेर काढा... मारा च्या घोषणा... लावा आग शेताला.. कुणीतरी बोललं आणि शेतात भराभर पेटलेले करंडे यायला लागले... भडाभडा शेतं जळू लागली...

आसिफभाई शेताच्या दुसऱ्या टोकाकडून बाहेर पडून सुकलेल्या  नदीच्या पात्रात उतरले.... पाण्याच्या झोता मुळे निर्माण झालेली एका कपारीत त्यांनी आश्रय घेतला.... तिथून ते कुणाला दिसत नव्हते....

दुपार टळून रात्र होत आली होती... टोळी तील युवक कधीच निघून गेले होते.."अब्बू कुठे असतील? पहिल्यांदाच भानावर येऊन त्याने स्वतः लाच प्रश्न विचारला... आणि लगेच तोंडावर गच्च हात दाबून तो बसला... तोंड उघडलं तर .????

नदीच्या काठी लपत लपत चालत राहिल्या नंतर आसिफभाई ना अश्याच एका दगडा मागे अब्बू भेटले...

रात्री कुणाचा तरी आवाज आला आणि आसिफभाई सावध झाले...लपलेल्या जागेतून त्यांनी पहिलं तर गावातील आदिवासी बायका डोक्यावर पाणी घेऊन त्यांनाच शोधत होत्या...बायकांनी शीळ वाजवली 

आसिफभाईनी परत शीळ वाजवून प्रत्युत्तर दिलं... 

बायका जवळ आल्या आणि त्यांनी भराभर भाकरी, चटणी आणि पाणी दिलं... बाकी लोकं कुठं आहेत त्याची विचारपूस केली.... "सगळं ठीक झाल्या शिवाय इथून हलू नका..". त्यांनी सांगितलं

हळू हळू लक्षात आलं कि शेतात, आजूबाजूला जवळ जवळ 80 माणसं लपलेली आहेत...

दुसऱ्या दिवशी पाणी, भाकरी घेऊन जास्त बायका आल्या....त्यांनी कपडे ही आणले होते ...आदिवासी बायकांचे आणि पुरुष मंडळीचे कपडे......प्रत्येकीने मुस्लिम महिलेला, मुलीला आदिवासी घागरा,चोळी, गळ्यातील डोरलं, अगदि हुबेहूब आदिवासी बनवून टाकलं... पुरुष,मुलगे ही आदिवासी वेष घालून तैयार झाले .." हे दाढीचं सामान" दाढी काढा... बाहेर वातावरण भडकलं आहे..राक्षस झालेत सगळे " आदिवासी बायांनी आपल्या बरोबर  या लोकांना लपवत घरी नेलं... आणि पुढचे कित्येक दिवस घरात लपवून ठेवलं...

थोडी माणसं ...बायका, मुलं जळालेल्या शेतात भस्म झाली होती .."आमच्यात जमिनीत मूठ माती दिल्या शिवाय जन्नत मिळत नाही... असिफ भाई चे अब्बू रडत रडत म्हणाले "तमे चिंता नो करता..अमे करसु" या लोकांनी त्यांच्या शेतात मेलेल्या लोकांना मूठ माती दिली...

सगळं शांत झाल्यावर जवळच्या बारीया शहरात रिलीफ केम्प मध्ये मुस्लिम बांधवाना सुखरूप सोडलं...

नंतर आम्ही त्यांना धान्य, पैसे देऊ केले..." अमाराथी नो लेवाय" (आम्ही घेऊ शकत नाही) 

आज या गावातील कोणीही बारीया आला तर तो आमच्या घरी "मेहमान" असतो... जन्म जन्मीचे उपकार आहेत त्यांचे...हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही...

लाख, करोड नव्हे तर पैशांनी तुलनाच करता येणार नाही असा माणुसकीचा अनमोल ठेवा या लोकांपाशी आहे..म्हणून बेन....मी इथे व्यापार करत नाही... करू शकत नाही...

आता मला समजलं .. त्या मुलाला फुकट देऊन लाजवायचं नव्हतं म्हणून 5 रुपये....

माणसाने माणसाशी माणसासम वागणे 

या वाक्यावर चर्चा करण्यासाठी मोठमोठाले सेमिनार होतात... कार्यशाळा होतात...

सागटाळा सारख्या गावातील आदिवासी माणुसकीच्या धर्मा पुढे बाकीचं सगळं खुजं आहे हे स्वतः जगून शिकवतात...चार पुस्तकं शिकून स्वतः ला शहाणी समजणारी मी.....मी  याना काय शिकवणार होते?

वाटलं ....मला पंख यावेत आणि मी सागटाळा गावातील प्रत्येकाला भेटावं... त्यांना माझ्या पंखावर बसवून माणुसकीचं बीज पेरायला शहर, नाका, गल्ली, बोळ सगळीकडे घेऊन जावं....!!.

कोठी ....

 आदिवासी गावातील एक घर.. जुन्या कौलांचं (इथे देशी नळे म्हणतात) ..लांबच्या लांब पडवी ...आणि 3 समांतर खोल्या... जमीन शेणाने सारवलेली .."बेन माटे कुर्सी लाओ" (बेन साठी खुर्ची आणा) म्हणत प्रेमाने आणून ठेवलेली एकुलती एक खुर्ची 

बेन घणा दिवसे आव्या (बेन खूप दिवसांनी आलात) म्हणत गलीबेन ने तोंडभर हसत स्वागत केलं .
मीटिंग संपल्यावर आम्ही गलीबेनच्या घरी च डाळ- भात जेवणार होतो...आत शिरताच आतल्या खोलीतल्या कोठ्यानी कोणाचंही लक्ष वेधून घ्यावं ...ह्या मातीच्या? कोणी बनवल्या? कधी? एवढा साचा कुठून आणलात? 
काय ठेवतात त्यात?माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु...
आत्ता पर्यंत आम्ही मीटिंग मोठ्याला आंब्याच्या झाडाखाली केली होती त्यामुमुळे गलीबेन च्या घरातील कोठ्या मी पहिल्यांदा च पाहिल्या...
"बेन मातीच्याच बनवतो... माझ्या सासू ने बनवल्या आहेत..किती वर्ष जुन्या माहिती आहे? 70 वर्ष होऊन गेली ..मी लग्न होऊन आले (12 व्या वर्षी) त्या वेळी बनवलेली हि शेवटची ... म्हणत दाखवली हिला 60 वर्ष झाली....
"त्या वेळी कोदरी (एक कडधान्य) पिकवायचो ..वर्ष भराच यात साठवायचं... मोठं कुटुंब होतं आमचं..15 माणसं व्हायची जेवणाला...72 वर्षांची गलीबेन ची सासू  (आज्जी) चा जुन्या आठवणी सांगताना चा आनंद चेहऱ्यावर ओसंडून जात होता...
"मने नही आवडतू " मला नाही येत कोठी बनवायला.. ती ने म्हणाली ...
" गावात कोणालाच नाही येत अश्या कोठ्या बनवायला... आता बेताच्या बनवतो, टोपल्या... आणि तेवढं धान्य तरी कुठं साठवतो? ...थोडं घरा पुरतं ठेवून विकतोच सगळं..."
आता काय ठेवलंय? एका कोठीत थोड्या तुरी ठेवल्या होत्या (आम्ही डाळ करून आणत नाही, घरीच करतो जात्यावर, आज खाशील तूरडाळीची आमटी" 
या 72 वर्षांच्या आज्जीने सकाळी जात्यावर बसून तुरी भरडून डाळ केली? "हां बेन" 
किती उत्साह.. कि आज आमच्या घरी मीटिंग आणि पाहुणे जेवतील... हे प्रेम, आपुलकी... आता मिळणे कठीण...
"खरी गंमत दाखवू?" आज्जी लहान मुलाच्या उत्साहाने म्हणाल्या... हो  दाखवा ना..सगळंच अद्भुत आहे इथं" मी म्हणाले 
"आज्जी कोपर्यातल्या कोठीत हात घालण्यासाठी रचून ठेवलेल्या पोत्यांवर अगदी सहज चढल्या...आत धुंडाळत त्यांनी त्यांनी एक लालसर धान्य बाहेर काढले ...माझ्या प्रश्नार्थ चेहऱ्याकडे पाहून आज्जी म्हणाल्या "कोदरी म्हणतात ती ही" हे 45 वर्ष जुनं आहे धान्य ..."45 वर्ष??" हो आता कोणी करत नाही गावात.. आम्ही पण नाही पेरली ...सासरे गेल्यापासून ' ..."आ बेन एमना हातनी एटले बगाडवी नहीं ...अमोने " सासऱ्यांने त्याच्या हाती कष्ट करून पिकवलेले शेवटचे धान्य "कोदरी" त्याची आठवण म्हणून 45 वर्षे साठवून ठेवणारी आज्जी.... 
"बेन गाममां कोई ने तकलीक थाय तो अमोना घरेथी लई जाय ...आजे पण .अमे जे होय ते आपीए...(गावात कुणाच्याही घरी धान्य नसेल तर इथून घेऊन जात) ...त्या कोठीने किती भुकेल्याना खाऊ घातलं असेल ??...आणि हे सगळं...कुठेही गाजा वाजा न करता ...
तिच्या हातावरचं ते धान्य बघताना मी तिच्या डोळ्यात तिच्या संसाराच्या आठवणी पाहत होते....ती नवलाईची सून म्हणून घरात आली असेल.. धान्य फाफडायला, कोठी सारवायला, आत धान्यभरायला, कोठी चं तोंड मातीने लिंपायाला तिच्या सासूला, चुलत सासू ला मदत केली असेल... हळू हळू काही वर्षांनी ही कोठीचं मॅनेजमेंट  तिच्या ताब्यात आलं असेल...अडीअडचणीला, सणासुदीला या कोठीतून धान्य काढून लोकांना दिलं असेल...किती समृद्ध आठवणी....
मी पाहिलं कि, ह्या आठवणी मात्र इतिहास नव्हत्या पण आजही आज्जीच्या घराचा कणा आहे ....गरीब परिस्थितीत हसत मुखाने समाधानी आयुष्य जगण्याची किल्ली आहे...
त्या वास्तूत हे समाधानाचे तरंग पसरलेले आहेत आणि पुढल्या पिढीला हि तोंड भर जिद्दीने जगण्याची, संकटं पेलण्याची आणि हसत हसत जीवनात सहजतेने पुढे जाण्याची, फक्त मी नव्हे तर आम्ही म्हणून बघण्याची शक्ती त्या तरंगातून मिळतेय ...
मी ही काही वेळ ह्या तरंगाना अनुभवत आणि समृद्ध बनले.... आणि मग आज्जीच्या आणि गलीबेनचा निरोप घेऊन दुसऱ्या गावी जायला निघाले ...
(हे लिखाण वाचून फोटो परत एकदा पाहावेत)
पंक्ती

दिल