गीत सिर्फ गीत नहीं होते ।

 शब्दों में तुम्हें वह उलझाए रखते 

सुर ओर ताल से  तुम्हें सहलाते 

उनकी लगन में गर हो गए मगन 

अतीत के आंगन में खेलकर  वह आते 

          गीत सिर्फ गीत नहीं होते ।


कभी तुम बैठे हो उदास उदास 

कोई अपना भी न हों तुम्हारे पास

चुटकी भर खुशी लेके पहुंचेंगे  गीत 

दोस्त, हमराही,फरिश्ता या मीत

     जो तुम चाहो वही बन जाते 

     गीत सिर्फ गीत नही होते 


दिलों की दूरियों को यह करते है कम 

बाँटने चले आते खुशी हो या गम

प्यार उनका देख आँखे हो जाए नम 

जोश उनका देखकर चलने लगे कदम 

     बदलाव का बिगुल भी यही है बजाते 

            गीत सिर्फ गीत नही होते 


तो चलो इन गीतों से दोस्ती कर लें 

 रंग इनसे लेकर, सपनों में भर लें 

इनके आँखों देंखें आज और कल 

हर पल से हम खुशी को चुन लें 

   अनोखी एक ऐसी सौगात है लाते

    गीत सिर्फ गीत नहीं होते 


                      पंक्ति 


लेन - देन

 रात को छोड़कर जब गगन उड़ता है

भोर की पंखुड़ियों में तब जगह पाता है 

नदी की धारा का सागर से होता मिलन

ऊँचे, ठंडे पहाड़ियोंका जब हाथ छूट जाता है। 


ऊंचे दरख्तों का हवाओं से बातें करना 

होता है मुमकिन है जब  बीज गड जाता है 

धरती को भिगोकर अपनी प्यास बुझाना 

होता है संभव.. जब बूँद घर छोड़ आता है


बचपन का नटखट आंगन छोड़ कर देखो तो 

जीवन की बाँसुरीका सूर मन लुभाता है।

रेशमी लम्हात जब हथेली से फिसल जाएँ...

चंद झुर्रियों में तब जीवन सिमट जाता है


संसार को छोड़ जब मन निकल पड़ता है 

धारा का दूजा छोर छूकर मुक्ति पाता है।

एक हाथ से कुछ छोड़...दूजे हाथ वह पाए 

दस्तूर यह दुनियाका अब समझ में आता है। 


                                         पंक्ति

संकल्प

 मुश्किलों की ना फिक्र मुझे 

ईनसे टक्कर हर पल है 

उनके फितरत से वाबस्ता

जीनकी आहट हर पल है ।


     कभी काँटे बन राह के 

     या झांझर, पायल ही बनकर 

     मेरी उम्मीद और हसरत को, 

      वह रोक लगाये हर पल है।


सदियों से यह दीवारें

सिसकियां मेरी सुनकर 

मूंद आँख और मुँह भी सीकर

टकराती मुझसे हर पल है ।


     हर ठोकर से हम उभरेंगे

     तू हर मुमकिन कोशिश कर

     नहीं रुकेंगे.. नहीं झुकेंगे

     बुलंद हौसलें हर पल है।


                          पंक्ति

એવી એક જગ્યા ....

 એક એવી જગ્યા


માથે-ખભે બોજો લઈ

આ ચાલતાં સૌ માનવી  

શોધતાં જગ્યા એવી 

બેસવા હળવા થઈ 


        જોઈએ જગ્યા એવી 

        કેમ અહીં ? ન પૂછે કોઈ

        ના મન ખોલવાનું કહે 

        ના ભાર તોલવાનું કહે 


કોઈ શર્ત સામે ન મૂકે

વંટોળ સામે ના ઝૂકે 

વિશ્વાસથી વિશ્વાસ ની 

 ડોર જે પકડી શકે


      ખૂબ મોટું છે  જગત 

       આવી એક જગ્યા જડે? 

        લાગણીના તાંતણાથી 

        ખડગ સામે જે લડે? 


ના જીતનો હિસ્સો બનું

ના હારનો કિસ્સો બનું

દુઃખ ટાણે યાદ આવે 

બસ..એવી જગ્યા બનું

     ...બસ..એવી જગ્યા બનું  .........

 

                    પંક્તિ

बस यही गुजारिश ....

 कोई तवक्कु न हों ..बस यही आरजू थी ...

कुछ लम्हे सुकूँ के ...बस एक ही गुजारिश थी...


     जिंदगी की दौड़ में कहीं खो न जाये हौसलें 

     रूह और अल्फाज में,  कभी हो न जाये फांसले 

    वक्त को आगाह करूँ यह कब मेरी फरमाइश थी? 

    कुछ लम्हे सुकूँ के...बस यही गुजारिश थी ....


दिन के फिराक में ...रात ना मायूस हों

दास्ताँ और हकीकत से जल्द ही मानूस हों

हर आफत मगर जैसे वक्त-ए आजमाईश थी....

कुछ लम्हे सुकूँ के...बस यही गुजारिश थी ...


  दूसरों के गम जियें इसपे ना मलाल हों 

  हर रंग के भीतर खिलता गर  गुलाल हों

  दो धारा पर नीर एक हों....बस यही  गुंजाइश थी

  कुछ लम्हे सुकूँ के...बस यही गुजारिश थी ..


कोई तवक्कु न हों ..बस यही आरजू थी ...

कुछ लम्हे सुकूँ के ...बस यही गुजारिश थी...


                                    पंक्ति 

तवक्कु - ख्वाईश, अपेक्षा, 

मानूस - घुल मिल जाना

मलाल- पछतावा

મન....

 આ મન કેવી ચીજ છે

કાંઈ સમજાતું નહીં યાર ....

         આંખો વગર રડી શકે..

         પાંખો વગર ઉડી શકે 

         જોઈ શકે  દૃષ્ટિ વગર 

         જગતના પેલા પાર 

આ મન કેવી ચીજ છે

કાંઈ સમજાતું નહીં યાર ....

         

        શબ્દો વગર બોલી શકે 

        બોલ્યો શબ્દ ઝીલી શકે 

        એક પળ માં ભીની આંખો 

         બીજા પળે લાવે બહાર 

આ મન કેવી ચીજ છે

કાંઈ સમજાતું નહીં યાર ....


      કરતબ ઘણા કરી બતાવે 

      પગ વગર ફરી બતાવે 

     રૂ જેવું હલકું હલકું 

     ક્યારેક પથ્થર જેવો ભાર  

આ મન કેવી ચીજ છે

કાંઈ સમજાતું નહીં યાર ....

         

      આ જેટલું મોટું થાય 

      ભૂલો, અપરાધ સમાઈ જાય 

      આ જ્યારે ઊંચું થાય...

       એને કશું જ ન સમજાય 

       મક્કમ બની પહાડ ખોદે

      તોડી નાખે બંધન હજાર

આ મન કેવી ચીજ છે

કાંઈ સમજાતું નહીં યાર ....

નાનપણ ફરી જીવીએ...?

 ક્યારેક મન ને એની રીતે વહેવા દઈએ

જે મૂર્ખાઈ કરવી હોય, કરવા દઈએ 


    રોક-ટોક તો રોજ રોજની  વાત છે...

    મન મુકીને ક્યારેક એને વરસવા દઈએ


ખડખડાટ હસવું એને ખૂબ ગમતુ

શું કહેશે લોકો ? બીક રહેવા દઈએ 

    

     સૌ બીઝી છે ફરમાઈશની મૈફિલ વચ્ચે 

      મનને એનું ગમતું કવન ગાવા દઈએ

સાયેબ ...તમે અહીં નૉ આવતા...

ત્રણ દિવસ અગાઉ જીવરાજ પાર્ક નું શાક માર્કેટ બંધ કર્યું છે.. ચા ની લારીઓ, બધીજ દુકાનો 2 દિવસ અગાઉ બંધ રાખવાની મૌખિક સૂચના છે. રોજિંદા કમાઈ પાર જીવનાર 2 હજાર ઉપરાંત પરિવારોની 3 દિવસની કમાણી જાય એ એમના માટે કેટલું મોટું નુકસાન... એમને મંત્રીશ્રીના આવવાની શિક્ષા કેમ?

ત્રયણ કલાક ની તમારી મિટિંગ માં
બગડ્યા અમારા ત્રયણ દાડા..
હાંજે હાંજે ત્રયણ કલાક
શાક લારી લઈને અમે ઉભા
રોજ કમાઈયે ત્યારે ખઈએ
આવી છે અમારી દશા ..
સાયેબ તમે અહીં નૉ આવતા
            મારી લારી ની બાજુમાં
            એક માજી બેસતા હતાં...
            કટકા માંથી બનાવેલા
            ઓશિકાના કવર વેંચતા
                પોલીસે એમનેય ઉઠાડ્યા છે.?.
                માંડ પચાહ રૂપયા હતા કમાતા
                    સાયેબ.. તમે અહીં નૉ આવતા....
વરહ પહેલા તમે સાયેબ
ઉઘાડી જીપમાં ફર્યા હતા
લાખ માણહ તમારી મિટિંગ માં
અહીં ભેગા થયા હતા...
અમોને કોઈ વાંધો નહતો સાયેબ
તમે આવ્યા અને ગયા હતા
સાયેબ પણ તમે અહીં નૉ આવતા
                    કોરોનાની લોકડાઉન પછી
                    માંડ રોટલા ભેગા થયા સીએ....
                    ડોઢ વરહથી તમને હું ખબર?
                    અમે કઈ રીતે જીવીએ સીએ...
                    કોઈ મોટા પોગ્રામ કરવા
                    અમે તમને નહીં કે'તા
                    સાયેબ તમે અહીં નૉ આવતા
રોજના પૈશા અમો વ્યાજે લાવીએ
સાયેબ... ત્યારે ધંદો કરી સકીએ
તમારે આવવાથી અમોને હું ફાયદો?
વ્યાજ ચઢવાનું બંધ થશે?
કે નહીં આલવાના હવેથી
ઉભા રહેવાનાં રોજ ના હપ્તા .. ??
સાયેબ તમે અહીં નૉ આવતા




तू बोलायचे नाही


नसू दे दु:खाला पार तू बोलायचे नाही

हृदय करू दे चीत्कार ..तू बोलायचे नाही

तुला आदेश आहे की जीभ कापून घे तुझी

तुझा होईल जयजयकार तू बोलायचे नाही


थोडा इतिहास पलटून बघ..विचार कर….

जे बोलले ते झाले ठार ...तू बोलायचे नाही

 कदाचित बोलण्याने जग जाणेल तुला  

पण न बोलण्यात आहे सार तू बोलायचे नाही


न बोलण्यात आहेत सर्वगूण तू जाण

पुरोगामी करताहेत पुकार तू बोलायचे नाही

अरे एक का? तुला लाखो साथ देतील

शर्त इतकीच की तू बोलायचे नाही   


बहिर्‍या नगरजनांची सजली आहे मैफिल

इरशाद इरशाद चा गजर तू बोलायचे नाही


 (मूळ कविता – पारुलबेन खख्खर, अनुवाद – पंक्ति जोग)


અધ્યાત્મનો રસ્તો સરળ છે?

 સામાન્ય રીતે આપણે અધ્યાત્મ જીવનના ઢળતા સમયમાં કરવાની વસ્તુ છે એવું માનીએ છીએ. પણ તે તો જીવન જીવવાની એક પદ્ધતિ સૂચવે છે ..જે જીવન જીવવાનું બાકી હોય ત્યારે વાંચવું જોઈએ, સમજવું જોઈએ અને અમલ કરવો જોઈએ... સંધ્યાકાળે તો માત્ર તે વાંચન પુરતું જ રહે ...કારણ ત્યારે આર્થિક, અને શારીરિક પરિસ્થિતી આપણા કંટ્રોલ માં હોતી નથી...એટલે તેનો અમલ કરાવવો અઘરો પડે.. જો કે સત્ય ની નિકટતા કોઈ પણ પળે કરો, મન ને શાંતિ મળશે તેની ખાતરી....

પણ આમાં એક પ્રોબ્લેમ છે... આ બધું સરળ કરીને કહેલું હોતું નથી... આ માર્ગ તો ખુબજ કઠિન છે?તેના પર યોગી સિદ્ધ લોકો જ ચાલી શકે આવું પહેલાથી જ કહેવામાં આવે તો આગળ જતાં પહેલાંજ લોકો હિંમત હારી જાય.....

એની ભાષા પણ સરળ નથી... બહુ કલીસ્ટ કરીને સમજાવ્યું છે.. રોજ બરોજ ની જિંદગી માં દેખાતા દૃષ્ટાંતો નથી..

ખરેખર તો આજ ની પળ એજ સાચું... અને તેમાં જ જીવવાનું છે... એટલે સભાનતાથી વિચારવાનું છે, બોલવાનું છે કૃતિ કરવાની છે...

ગઈકાલ પાછી આવવાની નથી, આવતી કાલ આપણા હાથ માં છે એટલે ગઈકાલ માટે  એવી કૃતિ ન કરીએ કે જેનાથી આવતી કાલ બગડી જાય...

આટલું સરળ કરીને કરી ન શકાય?

नातं नाळेचं ....

भावंडात माझा नंबर तिसरा...मोठा भाऊ आणि बहीण आणि मग मी..माझा झोक तात्यांकडे व मोठ्या बहिणीकडे...आईशी भांडणं व्हायची, फारसं पटत नसे..

मला बिस्कीट, चपाती वगैरे खायला आवडायचं आणि भात, आमटी नको होती..जेवणा वरून आई नेहमी बोलायची... शिवाय माझा मन घर कामात लागत नव्हतं..मला आपणहून काम दिसत नसे, सुचत नसे.. या उलट बहीण ती घरातील आणि बाहेरील सगळी कामं करत असे...अगदी लहानपणात ती स्वयंपाक करायला देखील शिकली...
मी मात्र सांगितलेलं काम कसंबसं करायचे आणि कुळागारात पळ काढायचे ...एक मुलगी म्हणून माझं हे वागणं तिला काधिच पसंत पडलं नाही. 
माझ्या वेळी आई गरोदर असताना तात्या बांधत असलेलं मातीचं घर पडलं... आम्हाला मामाच्या घरी राहावं लागलं आणि माझा जन्मही तिथेच झाला. घर पडलं हि घटना आईला खुपच हादरवून गेली.. तरी त्यातून मार्ग काढत आई तात्यांनी दुसरं घर बांधलं...
माझ्या जन्माच्या आधी असं झालं, असं लोकं नातेवाईक  म्हणत... त्यातून पत्रिकेत मला मंगळ ग्रह आला..आईच्या मनातही खोलवर कुठेतरी ही शंका आणि माझ्या भविष्याची चिंता घर करून होती.
लग्न करून आलेल्या बाईला तिच्या पोटी तिच्या नवऱ्याच्या वंशासाठी मुलगा जन्माला यावा ही इच्छा असते, नाहीतर सासर कडल्या लोकांची बोलणी, टोमणे तिच्या नशिबी येतात..माझा मोठा भाउ लहानपणी खूप आजारी असायचा. त्याला श्वेतपेशींची उणीव होती.. पाय पण सुजायचे.. कित्येकदा शाळेत गेल्यानंतर येताना त्याला उचलून घरी आणावा लागायचा... अश्या परिस्थितीत बहिणी नंतरच्या गरोदर पणात मुलगा व्हावा अशी एक अपेक्षा आईच्या मनात होती...
तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा चालवताना आई तात्यांची भांडणं व्हायची.. या सगळ्याला त्रासलेली आई अनेकदा आमच्या शेतात काम करायला येणाऱ्या लोकांना "कशी करणार मी दोन दोन मुलींची लग्न ?? मोठी तरी गुणी आहे पण ही?  असं बोलून दाखवायची...आणि तीचं काळजी कारणं अनाठायी नव्हतं.. कारण बहीण खुप सालस, कामसू, गुणी म्हणून प्रसिद्ध होती तर मी भांडकुदळ ...अनेक प्रश्न विचारणारी..सांगितलेलं ऐकून घेणं माझ्या स्वभावात नव्हतं...माझं कसं होणार?

3-4 वर्षांची असतानापासून हे संवाद, बोलणी मला आठवतात..आई मला बरी करत नाही.. तिला मोठी बहीण आवडते, मोठा भाऊ आजारी म्हणून त्याच्या कडे लक्ष असायचं ..आणि मलाच असं का वागवतात असा प्रश्न मला पडायचा...आईचा खूप राग यायचा? त्यात धाकटा भावाच्या जन्मा नंतर आईचा वेळ घर काम आणि भावाचं करण्यात जायचा...मी मोठ्या बहिणीशी आणि तात्या शी close होत गेले आई बरोबर तसं सूत कधी जमलं नाही..
कधी नातेवाईक किंवा शाळेत कुणी विचारायचे आई आवडते कि तात्या...??  मी क्षणाचाही विलंब न करता 'तात्या' असं उत्तर देत असे...पुढे शाळेत, कॉलेजात, आणि माझ्या कामाच्या जागीही माझं हे तात्या प्रेम खूप फेमस झालं होतं...

आई खुप काम करायची घर, कुळागर दोन्ही बाजू सांभाळायची... जेवण करण्यात तिचा हात खंडा होता.. गोवन चण्याचो रोस, श्रीखंड, तुरीच्या डाळीचे सार, सुक्या मिरच्यांची चटणी, लोणचे, पानगा, असेल त्या सामानात ती अगदी चविष्ट जेवण करी..
आमच्या कडून अनेक स्त्रोत्र, कविता, परवचा म्हणून घेई, पावकी, दिडकी, औटकी ही तिला पाठ होती.. तिला शिकायची खूप इच्छा असूनही शिकायला मिळालं नव्हतं..त्या मुळे आम्हाला अभ्यासाला आई धारेवर धरायची...तिला अनेक गाणी तोंड पाठ असत..खुप छान गाणी म्हणे.."प्रेम स्वरूप आई ..वात्सल्य सिंधु आई." .हे गाणं ऐकताना तर रडू च येई...
सगळं काम आवरून ती दुपारचं वर्तमान पत्र घेऊन बसे.. सगळ्या बातम्या, आणि राजकारणातील घडामोडी वगेरे वाचल्याशिवाय तिला जेवण जात नसे.. कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्य मंत्री कोण आहेत, कुठे निवडणुका आहेत सगळं रुची घेऊन वाचत असे.. सामान्य ज्ञानाच्या विषयात एखादा असा प्रश्न आला कि मी तिला विचारायचे...
वाढत्या वया बरोबर आई मुलीत एक मैत्रीचं नातं निर्माण होतं...शाळा कॉलेज च्या मैत्रिणींच्या गोष्टी सांगण्याची ती जागा बनते...हे मी माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत बघत होते... पण माझ्या बाबतीत हि जागा माझी बहीण होती आई नव्हे....
समज  आल्यावर आईच्या बाबतीत लं माझं हे वागण्या विषयी मलाच आश्चर्य वाटायचं पण त्यात सुधारणा होईल असं काही घडलं नाही ..कॉलेज मध्ये असताना मी थोडं  वेगळं काम करायला सुरुवात केली होती.दुसर्यांचे प्रोब्लेम ऐकायचे व त्यांना मोकळं व्हायला जागा द्यायची, थोडं गाईड करायचं वगैरे मी करत असे.. व्यसन असलेल्या, किंवा वाईट संगत असलेल्या  अनेक मुलांशी परिचय होता,  मैत्री होती त्यांना त्यातून बाहेर काढणं हे जवाबदारी म्हणून स्वीकारलं होतं...आई तात्यांना ते आवडायचं नाही... खरं तर मी मुलगी म्हणून त्यांना भीती च वाटायची... "आमच्या कडे पैसे नाहीत, आहे ती इज्जत, ती तुम्ही जपा" असं आई सांगायची... आई वडील म्हणून काळजी पोटी होणारं त्यांचं बोलणं आता समजलं तरी त्या वेळी ते पायात बेड्या टाकल्या सारखं वाटायचं...
मी मुलगी म्हणून मला काहीच फ्रीडम नाही? असं का? मी का स्पष्टीकरण देत बसू कि मी कुठे गेली ते?असा अविश्वास मुलीच्या बाबतीतच का दाखवला जातो?एक ने अनेक प्रश्न मला नेहमी सतावूनसोडत... आई का नाही माझी बाजू घेत? हि माझी तिच्या बाबतीतली तक्रार...घरातील साध्या साध्या गोष्टींनी पण आईचं ढळतं माप भावांच्या बाजूने च असायचं....

2001 मध्ये गोवा सोडला... सामाजिक क्षेत्रात लं काहीच माहित नव्हतं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं.. खूप मन लावून दिवस रात्र मेहनत करायचो...गावा गावांनी फिरायचो.. लोकांना भेटणं, तिथं काम करणं, बरे वाईट अनुभव, अपमान, दोष, सगळं सहन करत टिकून राहायला शिकलो...
हे करत असताना मला अतिशय बिकट परिस्थितीतील लोकांचं जीवन जवळून पहाता आलं आणि मला आई च्या वागण्या मागची कारणं उमगली...
मग मी कधी कधी घरी यायचे... आई तेव्हा नातवंडांत रमून गेलेली.. मी आले कि माझं सगळं करायची, जीव ओतून करायची, पण माझी भूमिका हळू हळू काळजी घेणाऱ्या साईडला येऊ लागली होती.. तात्यांचे आरोग्याचे प्रोब्लेम सुरु झाले होते... त्यामुळे अपेक्षा आपोआप कमी होत गेल्या... आणि जे प्रेम काही घरून मिळत होतं ते बोनस वाटायला लागलं...
मानसिक आरोग्य बिघडण्याची पहिली ओळख होते माणसाच्या वागणुकीवरून... खूप राग राग करणं, त्रागा करणं याला आपण स्वभाव चा भाग गृहीत धरतो... तो फक्त  स्वभावाचा भाग नसून मानसिक स्वास्थ्य ठीक नसण्याची लक्षणं असतात... मन सतत excite, अशांत राहण्याची लक्षणं असतात आणि वेळेवर उपचार झाले तर हे प्रोब्लेम बऱ्याच अंशी ठीक होऊ शकतात...
आई ने जीवनात सहन केलेले उतार चढाव, तात्यांच्या स्वभाव, माहेरची माया न मिळणं, सासरी ही अपेक्षा भंग, गरिबीत तात्यांच्या संघर्षात तिची साथ सतत राहिली पण अपेक्षा भंग, याआणि कोंडमारा या मुळे मानसिक संतुलन ढासळलं... ते शेवट पर्यंत कधी ठीक होऊ च शकलं नाही... त्या नंतर आम्हा भावंडांची भूमिका तिची  आई व्हायची होती ...पण ते किती कठीण असतं ते आम्हाला समजलं....
मी तिला माझ्या बरोबर एक दोनदा अहमदाबादला नेली... गावातल्या कामात ती कधी कधी थोडीशी रमायची...पण परत गाडी मूळ पदावर यायची...
एकेकाळी चांगलं जेवण करण्यात फेमस, लोकांना मदत करणारी, अडी अडचणीला धावून जाणारी, मेहनत हाच जीवन मंत्र मानणारी आई आता परावलंबी होत होती.. तीच्या वागण्या मुळे, मानसिक अवस्थे मुळे  कित्येकदा मी तिच्यावर रागवायचे .
मागच्या दोन वर्षात ती जास्त थकली... आता अहमदाबादला जाऊ शकणार नाही हे तिला कळत होतं..  मी (शाणू) कधी येणार हे विचारीत राहायची
या वेळेला 25 एप्रिल घरी आले. मी खुप दिवस राहणार म्हणून खुश होती... खूप गोष्टीही केल्या...27 तारखेला घाणा भरताना म्हणण्याच्या ओव्या ही तिने म्हणून दाखवल्या. भावाच्या मुलाच्या मुंजीत आईला दोन्ही दिवस आणली, ती थकलेली वाटत होती...2 मे ला मोठ्या भावा बरोबर घरी जाताना तू ये असं म्हणत होती , मी दोन दिवसांनी येते म्हणून तिला समजावलं 3 ला दुपार पासून सणकुन ताप भरला..रात्री हॉस्पिटल मध्ये आणली, पण .4 मे ला पहाटे आईने exit घेतली जीवन रीतं,होऊन गेलं ..तिचं ते परत परत एकच वाक्य बोलणं "शाणू माझे पाय चालत नाय" कानात परत परत घुमत राहतं ... आई असताना तीची मला किंमत नव्हती, तिच्याशी मैत्री नव्हती... आज ती नाही तेव्हा तेव्हा ती माझ्या साठी काय होती हे कळतंय...
जन्मा नंतर नाळ कापून मुलाला वेगळं करतात..पण ही नाळ कधी कापलीच जात नाही ...आई-मुलाचं हे नाळेचं नातं सगळ्या मतभेदांच्या पलीकडलं असतं....काळा वेळाच्या बंधनातुन मुक्त असतं....

सीखना अभी बाकी है

दोस्त... तेरे बगैर जीना

सीखना अभी बाकी है
नए पते पे चिठ्ठी तुझे 
लिखना अभी बाकी है।

       कोई पहले जायेगा 
       और दूजे को रहना इधर 
       रहना मगर किस तरह
       सीखना अभी बाकी है ।

चाय नाश्ते पे गपशप 
सुनी सी है सुबह अब 
एक ही कप चाय बनाऊँ
सीखना अभी बाकि है ।

     दुनिया कहे अपनों का गम...
     समय के साथ होता कम 
     समय को मगर कैसे बिताना..
     सीखना अभी बाकी है।

                 पंक्ति

माणुसकी पेरणारी माणसं ...

 आदिवासी क्षेत्रातील "सागटाळा" हे डोंगराच्या कुशीत विसावलेलं 3 वाडयांचं गाव. 

गावाच्या चहू बाजूनी जंगल .आणि हो ...एका वाड्या वरून दुसऱ्या वाड्या वर जायचं तरी जंगलातूनच जावं लागेल..

जंगलातच लोकांची शेती...पिढ्यान पिढ्या कसत असले तरी कागदोपत्राच्या कचाट्यात सापडल्या मुळे लोकांच्या नावावर नसलेली पावसाळी शेती....

शेतात पिकलेले दाणे 6-8 महिने पुरतात आणि नंतर व्होराच्या दुकानातून विकत किंवा उधार...

इकडे गावात व्होरा समाजातील लोकांची दुकानं 

धर्माने मुस्लिम पण व्यापारी वर्ग असल्यामुळे त्यांची इतर धर्मातल्या लोकांशी फार जवळीक ...

गावातील व्होराचं दुकान हे 12 महिने बेधडक शेतातल्या दाण्या पासून, मधापर्यंत, महुडयाच्या फुलांपासून कच्च्या कैऱ्या, चिंचा, डिंक...सगळं विकण्याची आणि खरीदण्याची हमखास जागा...!! 

गावात मीटिंग करत असताना मुलं जमतातच.. काही तर फारच लहानगी आई च्या मांडीवर बसूनच असतात...

मीटिंग चालू होण्यापूर्वी मुलां साठी काहीबाही खाऊ नेण्याची आमची रोजची  सवय.... त्या निमित्ताने काही सकस आहार पोटात जातो... आणि मीटिंग पण 2 तास आरामात करता येते...

एखादा गंभीर प्रश्न चर्चेला असेल तर आमच्यातील एखाद्याने मुलांना बघण्याची भूमीका घ्यायची ..हे ही ठरलेलं...

त्या दिवशी जाताना काही घेऊन जाता आलं नाही ..म्हणून गावातील एकुलत्या एक व्होरा च्या दुकानात शिरले  

गावातील या छोटेखानी दुकानात हमखास मिळणारी वस्तू म्हणजे गूळ, चणे, शेंगदाणे ...मी त्याला ते द्यायला सांगितले तेवढ्यात एक लहानसा मुलगा 5 रुपये घेऊन "बा ए मसालो आलवानु कह्यु स" असं बोलून उभा राहिला..

आसिफभाई (दुकानदार) नी छोट्या पुड्या करून मिरची पावडर, धणे, जिरे, हळद आणि थोडंसं तेलही बांधून दिलं...मुलगा निघून गेला... मी पहातच राहिले ..

आपला देश... लाखो रुपयांची बेग, करोड रुपयांचा ड्रेस घालणाऱ्या लोकांचा ही आणि 5 रुपयात भाजी, आमटीचं सामान नेणाऱ्या आदिवासींचा ही....

मला खिन्न पाहून आसिफभाई म्हणाले," बेन पैसा नथी... पण मोल न करी शकाय ऐवी माणसाईथी भरेला छे आ लोको" 1 रूपियो लई ने आवे तोय सामान आलु हूं.(बेन, गरीब असतील पण माणुसकीच्या खजिन्याची धनी आहेत ही लोकं..5 नव्हे 1 रुपया घेऊन आली ना तरीही देतो मी सामान त्यांना)

आणि मग आसिफ भाईनी संपूर्ण कहाणी सांगितली ...

2002 च्या दंग्या वेळेची कहाणी ...आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकानी होते ..गोधरा आणि त्या नंतर चाललेली दंगल गावात पोचेल असा अंदाज नव्हता... वातावरण तणावग्रस्त असलं तरी गावातील दुकानं उघडत होती... अचानक त्या दिवशी सकाळी 11:30 सुमारास गावात अचानक एक जीप आली.. तलवारी घेऊन उभे राहिलेले युवक.. गावात येऊन त्यांनी युवकांना भडकवायला सुरुवात केली

काढा त्यांना घरा बाहेर ...गावा बाहेर...वेशी बाहेर आणि आमच्या ताब्यात द्या...

आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकान तसंच टाकून पळाले... गावाच्या सीमेवरील जंगलात, शेतात... कुठे जाऊ आणि काय करू असं त्यांना झालं होतं...

तेवढ्यात दुसऱ्या वाड्यावरील आणि गावातील मुसलमान लोकं धावत आली... कुठेतरी शेतात लपली...

थोड्या वेळानं टोळी आली.. कुठे गेले.. बाहेर काढा... मारा च्या घोषणा... लावा आग शेताला.. कुणीतरी बोललं आणि शेतात भराभर पेटलेले करंडे यायला लागले... भडाभडा शेतं जळू लागली...

आसिफभाई शेताच्या दुसऱ्या टोकाकडून बाहेर पडून सुकलेल्या  नदीच्या पात्रात उतरले.... पाण्याच्या झोता मुळे निर्माण झालेली एका कपारीत त्यांनी आश्रय घेतला.... तिथून ते कुणाला दिसत नव्हते....

दुपार टळून रात्र होत आली होती... टोळी तील युवक कधीच निघून गेले होते.."अब्बू कुठे असतील? पहिल्यांदाच भानावर येऊन त्याने स्वतः लाच प्रश्न विचारला... आणि लगेच तोंडावर गच्च हात दाबून तो बसला... तोंड उघडलं तर .????

नदीच्या काठी लपत लपत चालत राहिल्या नंतर आसिफभाई ना अश्याच एका दगडा मागे अब्बू भेटले...

रात्री कुणाचा तरी आवाज आला आणि आसिफभाई सावध झाले...लपलेल्या जागेतून त्यांनी पहिलं तर गावातील आदिवासी बायका डोक्यावर पाणी घेऊन त्यांनाच शोधत होत्या...बायकांनी शीळ वाजवली 

आसिफभाईनी परत शीळ वाजवून प्रत्युत्तर दिलं... 

बायका जवळ आल्या आणि त्यांनी भराभर भाकरी, चटणी आणि पाणी दिलं... बाकी लोकं कुठं आहेत त्याची विचारपूस केली.... "सगळं ठीक झाल्या शिवाय इथून हलू नका..". त्यांनी सांगितलं

हळू हळू लक्षात आलं कि शेतात, आजूबाजूला जवळ जवळ 80 माणसं लपलेली आहेत...

दुसऱ्या दिवशी पाणी, भाकरी घेऊन जास्त बायका आल्या....त्यांनी कपडे ही आणले होते ...आदिवासी बायकांचे आणि पुरुष मंडळीचे कपडे......प्रत्येकीने मुस्लिम महिलेला, मुलीला आदिवासी घागरा,चोळी, गळ्यातील डोरलं, अगदि हुबेहूब आदिवासी बनवून टाकलं... पुरुष,मुलगे ही आदिवासी वेष घालून तैयार झाले .." हे दाढीचं सामान" दाढी काढा... बाहेर वातावरण भडकलं आहे..राक्षस झालेत सगळे " आदिवासी बायांनी आपल्या बरोबर  या लोकांना लपवत घरी नेलं... आणि पुढचे कित्येक दिवस घरात लपवून ठेवलं...

थोडी माणसं ...बायका, मुलं जळालेल्या शेतात भस्म झाली होती .."आमच्यात जमिनीत मूठ माती दिल्या शिवाय जन्नत मिळत नाही... असिफ भाई चे अब्बू रडत रडत म्हणाले "तमे चिंता नो करता..अमे करसु" या लोकांनी त्यांच्या शेतात मेलेल्या लोकांना मूठ माती दिली...

सगळं शांत झाल्यावर जवळच्या बारीया शहरात रिलीफ केम्प मध्ये मुस्लिम बांधवाना सुखरूप सोडलं...

नंतर आम्ही त्यांना धान्य, पैसे देऊ केले..." अमाराथी नो लेवाय" (आम्ही घेऊ शकत नाही) 

आज या गावातील कोणीही बारीया आला तर तो आमच्या घरी "मेहमान" असतो... जन्म जन्मीचे उपकार आहेत त्यांचे...हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही...

लाख, करोड नव्हे तर पैशांनी तुलनाच करता येणार नाही असा माणुसकीचा अनमोल ठेवा या लोकांपाशी आहे..म्हणून बेन....मी इथे व्यापार करत नाही... करू शकत नाही...

आता मला समजलं .. त्या मुलाला फुकट देऊन लाजवायचं नव्हतं म्हणून 5 रुपये....

माणसाने माणसाशी माणसासम वागणे 

या वाक्यावर चर्चा करण्यासाठी मोठमोठाले सेमिनार होतात... कार्यशाळा होतात...

सागटाळा सारख्या गावातील आदिवासी माणुसकीच्या धर्मा पुढे बाकीचं सगळं खुजं आहे हे स्वतः जगून शिकवतात...चार पुस्तकं शिकून स्वतः ला शहाणी समजणारी मी.....मी  याना काय शिकवणार होते?

वाटलं ....मला पंख यावेत आणि मी सागटाळा गावातील प्रत्येकाला भेटावं... त्यांना माझ्या पंखावर बसवून माणुसकीचं बीज पेरायला शहर, नाका, गल्ली, बोळ सगळीकडे घेऊन जावं....!!.

कोठी ....

 आदिवासी गावातील एक घर.. जुन्या कौलांचं (इथे देशी नळे म्हणतात) ..लांबच्या लांब पडवी ...आणि 3 समांतर खोल्या... जमीन शेणाने सारवलेली .."बेन माटे कुर्सी लाओ" (बेन साठी खुर्ची आणा) म्हणत प्रेमाने आणून ठेवलेली एकुलती एक खुर्ची 

बेन घणा दिवसे आव्या (बेन खूप दिवसांनी आलात) म्हणत गलीबेन ने तोंडभर हसत स्वागत केलं .
मीटिंग संपल्यावर आम्ही गलीबेनच्या घरी च डाळ- भात जेवणार होतो...आत शिरताच आतल्या खोलीतल्या कोठ्यानी कोणाचंही लक्ष वेधून घ्यावं ...ह्या मातीच्या? कोणी बनवल्या? कधी? एवढा साचा कुठून आणलात? 
काय ठेवतात त्यात?माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु...
आत्ता पर्यंत आम्ही मीटिंग मोठ्याला आंब्याच्या झाडाखाली केली होती त्यामुमुळे गलीबेन च्या घरातील कोठ्या मी पहिल्यांदा च पाहिल्या...
"बेन मातीच्याच बनवतो... माझ्या सासू ने बनवल्या आहेत..किती वर्ष जुन्या माहिती आहे? 70 वर्ष होऊन गेली ..मी लग्न होऊन आले (12 व्या वर्षी) त्या वेळी बनवलेली हि शेवटची ... म्हणत दाखवली हिला 60 वर्ष झाली....
"त्या वेळी कोदरी (एक कडधान्य) पिकवायचो ..वर्ष भराच यात साठवायचं... मोठं कुटुंब होतं आमचं..15 माणसं व्हायची जेवणाला...72 वर्षांची गलीबेन ची सासू  (आज्जी) चा जुन्या आठवणी सांगताना चा आनंद चेहऱ्यावर ओसंडून जात होता...
"मने नही आवडतू " मला नाही येत कोठी बनवायला.. ती ने म्हणाली ...
" गावात कोणालाच नाही येत अश्या कोठ्या बनवायला... आता बेताच्या बनवतो, टोपल्या... आणि तेवढं धान्य तरी कुठं साठवतो? ...थोडं घरा पुरतं ठेवून विकतोच सगळं..."
आता काय ठेवलंय? एका कोठीत थोड्या तुरी ठेवल्या होत्या (आम्ही डाळ करून आणत नाही, घरीच करतो जात्यावर, आज खाशील तूरडाळीची आमटी" 
या 72 वर्षांच्या आज्जीने सकाळी जात्यावर बसून तुरी भरडून डाळ केली? "हां बेन" 
किती उत्साह.. कि आज आमच्या घरी मीटिंग आणि पाहुणे जेवतील... हे प्रेम, आपुलकी... आता मिळणे कठीण...
"खरी गंमत दाखवू?" आज्जी लहान मुलाच्या उत्साहाने म्हणाल्या... हो  दाखवा ना..सगळंच अद्भुत आहे इथं" मी म्हणाले 
"आज्जी कोपर्यातल्या कोठीत हात घालण्यासाठी रचून ठेवलेल्या पोत्यांवर अगदी सहज चढल्या...आत धुंडाळत त्यांनी त्यांनी एक लालसर धान्य बाहेर काढले ...माझ्या प्रश्नार्थ चेहऱ्याकडे पाहून आज्जी म्हणाल्या "कोदरी म्हणतात ती ही" हे 45 वर्ष जुनं आहे धान्य ..."45 वर्ष??" हो आता कोणी करत नाही गावात.. आम्ही पण नाही पेरली ...सासरे गेल्यापासून ' ..."आ बेन एमना हातनी एटले बगाडवी नहीं ...अमोने " सासऱ्यांने त्याच्या हाती कष्ट करून पिकवलेले शेवटचे धान्य "कोदरी" त्याची आठवण म्हणून 45 वर्षे साठवून ठेवणारी आज्जी.... 
"बेन गाममां कोई ने तकलीक थाय तो अमोना घरेथी लई जाय ...आजे पण .अमे जे होय ते आपीए...(गावात कुणाच्याही घरी धान्य नसेल तर इथून घेऊन जात) ...त्या कोठीने किती भुकेल्याना खाऊ घातलं असेल ??...आणि हे सगळं...कुठेही गाजा वाजा न करता ...
तिच्या हातावरचं ते धान्य बघताना मी तिच्या डोळ्यात तिच्या संसाराच्या आठवणी पाहत होते....ती नवलाईची सून म्हणून घरात आली असेल.. धान्य फाफडायला, कोठी सारवायला, आत धान्यभरायला, कोठी चं तोंड मातीने लिंपायाला तिच्या सासूला, चुलत सासू ला मदत केली असेल... हळू हळू काही वर्षांनी ही कोठीचं मॅनेजमेंट  तिच्या ताब्यात आलं असेल...अडीअडचणीला, सणासुदीला या कोठीतून धान्य काढून लोकांना दिलं असेल...किती समृद्ध आठवणी....
मी पाहिलं कि, ह्या आठवणी मात्र इतिहास नव्हत्या पण आजही आज्जीच्या घराचा कणा आहे ....गरीब परिस्थितीत हसत मुखाने समाधानी आयुष्य जगण्याची किल्ली आहे...
त्या वास्तूत हे समाधानाचे तरंग पसरलेले आहेत आणि पुढल्या पिढीला हि तोंड भर जिद्दीने जगण्याची, संकटं पेलण्याची आणि हसत हसत जीवनात सहजतेने पुढे जाण्याची, फक्त मी नव्हे तर आम्ही म्हणून बघण्याची शक्ती त्या तरंगातून मिळतेय ...
मी ही काही वेळ ह्या तरंगाना अनुभवत आणि समृद्ध बनले.... आणि मग आज्जीच्या आणि गलीबेनचा निरोप घेऊन दुसऱ्या गावी जायला निघाले ...
(हे लिखाण वाचून फोटो परत एकदा पाहावेत)
पंक्ती

भोर की ओर

 


जब अपने चले जाते है....

कहते है ..रोना नहीं ..
उनको बहुत दुःख होगा
पीड़ा लेकर उस रूह को 
सफ़र लंबा करना होगा

कहते है हाथ न पकड़ना 
वह जा नहीं पाएंगे 
जीवन के इस चक्र में
फिर जकड़े जायेंगे

कहते है हौसला रखो
इक दिन सबको जाना है
और जानेवाले सबको लेकिन 
लौटके फिर आना है

जन्म मृत्यु के गतिचक्र 
का भेद बुद्ध ने जाना था
भूत- भविष्य को भुलाकर 
उसने आज को पहचाना था

उतनी ज्ञानी तो न हूँ मैं 
की सुख दुःख से परे रहूँ 
दोनों को बस अपना लूँ मैं 
दोनों के साथ चले चलूँ....

जानेवाले की याद में 
जी भर कर मैं रो भी लूँ 
यादों का छोर लिए हाथ में 
मैं भोर की और चलूँ 
मैं भोर की और चलूँ

पंक्ति



હે. જીંદગી.....

 તારા આપેલા સુખને હું ચાહું

અને દુઃખથી દૂર ભાગી જાઉં ...

જીંદગી ..આવી તો કેવી રીતે જીવું?


તારા બંને મુઠ્ઠીમાં ભરાયેલી છે ..

અગણિત પળો...કેટકેટલી યાદો..

ખાટી-મીઠી, કડવી, ખારી..જૂની-નવી...

ગમતી.. અણગમતી...યાદો....

મીઠી યાદોની મુઠ્ઠી હું ખોલું..

અને બીજી મુઠ્ઠી ને પાછી ધકેલું...

જીંદગી આવી તો કેવી રીતે જીવું?


તારી સાથે નહીં તો યાદોની સાથે 

હરેક પળ ફરી માણવા દો ...

ક્યારેક હસવાની સાથે રડવાનું ગમે ....

એવી રમત સ્મૃતિઓમાં રમવા દો...

પ્રત્યેક દાવ પર શીખું કઈંક નવું

જીંદગી હું તને એવી રીતે જીવું....

मेरी कहानी...

 कभी मै बनके तुम....

मुझको देखो तो जानो...

सह गई हूँ मैं कीन....

घावों को अक्सर....


मैने हंसकर तेरा...

बोझ सारा लिया...

तुने जी भर जीया है...

मेरे हीस्से का बचपन...


मेरे पहले ही तेरी

बारी थी हर वक्त....

चाहे खाने की बात हों

या हो कोई खिलौना .....


कभी आसान ना थी....

यह मंजिल यह सफर....

होंसलों से...बुलंद की....

हर मुश्किल डगर.


अब मैं तुझसे बडी हूँ....

दुनिया से लडी हूँ.....

हर एक जगह मैं ....

पैर गड कर खडी हूँ....


सोच अब तुझे तो

बदलनी पडेगी.....

मेरी पहचान ही अब 

तुझसे भीडेगी....


पंक्ति

हुआ आज मैं गुंगा बहरा .....

तुने देखा क्या आज फिर,

गांधी बापु रोया था। 

अमीरों के शौख शान पर

गरीबोंको जब दफनाया था। 

                           

          

जब....

 जब कोई बात हो...

    और न कोई साथ हो...
   समय के साथ का ...
   साथ तू जोड़ लेना ...
           और फिर खड़े होना ....

     जब सवाल खड़े हों...
'जवाबों' से बड़े हों ....
जब "तू" और "तू" ही ...
आपस में लड़े हों ...
स्वयं की शक्ति को 
धैर्य से जोड़ लेना.. 
         और फिर खड़े होना ...

    जब प्रवाह की दिशा से 
    तेरी दिशा हो अलग
    न मन में हो शंका ..
   न हो तेरे पैर डग-मग 
       "तुझ से ही शुरू ....
         नई दिशा का है होना...."
                बन अटल .बन निडर 
          और फिर खड़े होना

पंक्ति .

જયારે જોવાનું હતું ..

 જયારે જોવાનું હતું...

ત્યારે મેં આંખ મીંચી 

ઝળહળતી રોશનીને 
બેઠો સપના વેંચી ...

       જયારે સાંભળવાનું હતું
      ત્યારે ભર્યું  કાનમાં રુ...
      ચીસા ચીસ ને બુમાબુમ 
      મને લાગ્યું કાવતરું

જયારે બોલવાનું હતું 
ત્યારે મોઢામાં ભર્યા મગ
મારુ શુ? મને શું? 
તેનાથી શું બદલાશે જગ?

     જયારે ભેગા ચાલવાનું હતું 
     ત્યારે ખુલ્લા જ હતા પગ 
     પણ આંખ, કાન ને મોઢા વગર
     ગુલામ શરીર ..ગુલામ મગજ...

પંક્તિ 

और मैंने एक दोस्त खो दिया ...

मेरे लिए इस संसार की सबसे खूबसूरत चीज है दोस्ती . लेकिन आज भी लड़की को इस नायाब तोहफे से महरूम रखा जाता है ....क्योंकि वह एक लड़की है....समाज के इस कोतेेपन को दर्शाती है यह कविता ..

एक दोस्त खो दिया ...

हाथ में हाथ डाले  
हम स्कूल जाते थे  ...
इमली, चॉकलेट पेपर मिंट
मिल बाँटकर खाते थे

कीचड़, पत्थर कच्चा रस्ता
पैर फिसले तो गिर जाए बस्ता
कभी तू मुझे तो मैं तुझे
गिरने पर संभालते थे...

ना तुम boy थे ना मैं थी girl
हम सिर्फ  दोस्त थे हर पल
फिर क्यों कहा इक दिन सब ने ?
तू लड़की है... अब तो संभल...?

झट से तेरा हाथ छूट गया
कुछ दूरी पर तू सिमट गया..
दोस्ती, यारी, हँसना ..रुठना..
लड़का लड़की में बंट गया...

मैंने एक दोस्त खो दिया.....

अरे घर पर भी तो यही हुआ
पहले नानी, चाची  और फिर बुआ
सयानी हो गई ...सलीका सिखना
अब तू पापा से न लिपटना..

और मैने एक दोस्त खो दिया  .

पापा के साथ भाई भी छूटा
मस्ती- मजाक सब बंद?  दिल पूरा टूटा
इस सयानेपन के आने से
मेरा बचपन ही मुझसे रूठा

मैंने एक औऱ दोस्त खो दिया...

दुनिया के दस्तूर से मैं बड़ी हो गई
खुद को संभलकर खड़ी हो गई...
फिर कॉलेज में प्यारा दोस्त मिला
उसके साथ में बचपन को फिर जिया

प्यारी सी दोस्ती थी और  दोस्ती में प्यार था
पर उसपर भी सवाल उठे ..जमाने का दस्तूर था
कौन है वो? तुझसे करेगा शादी?
लड़कियों के लिए अच्छी है क्या?
ऐसी छूट और इतनी आजादी ?

और मैने दोस्त खो दिया...

फिर शादी की, एक पति मिला
मैंने समझा चलो दोस्त मिला
वो मेरा.. मैं उसकी..हक्क से लड़ूंगी
कान खिचूँगी उसके...हँसी मजाक भी करूँगी

पर मेरा सोचना होना न था
पति को दोस्त बनना न था..
दोस्ती नाम का रिश्ता अब पराया सा है
शादी के बाद दोस्ती? एक गुनाह सा है.

पिता, भाई, पति और माता
क्यों चाहिए तुझे और कोई नाता?
मैने भी यह कानून मान लिया
लड़की को 'दोस्त' नहीं होता जान लिया

पंक्ति

स्वतंत्रता ....

(मेरे लिए)न्याय मांगने से पहले....
थोडासा यह भी गौर करो 
कतई नहीं बर्दाश्त मुझे
न्याय के नाम कुछ औऱ करो ...

अगर न्याय दिलाना  मुझे 
न्यायी  बनना पहले सीख
बेखौफ माहौल कैसे होगा
उस पर सोच... उस पर लिख

सदियों पुराने रीतीरिवाज
तोड़ने होंगे तुम्हे आज
दहलीज, घूंघट, परदा सब से 
परे है सम्मान की यह बात...

बहन, पत्नी को सुनना होगा 
हर निर्णय में लें वह हिस्सा
बोझ नही मैं, न हूँ अमानत 
जोक, मजाक ना मैं किस्सा

गली मोहल्ले में जब तू होगा
दोस्तों यारों के  संग, 
कोई लडक़ी, कोई औरत 
देखके तू बदल न रंग

"चीज" कहकर होश न गवाँना
यारों को भी तुम संभालना 
जिम्मा तेरा....डरे नहीं वह 
खुद को यह एहसास दिलाना

कभी बस, ट्रेन की सफर में 
नन्ही बच्ची लिए गोद में
दर्द में कराहती दिखेगी
बच्चे को संजोए कोख में

झट से उठ जगह तू दे 
राह न देख किसी और की,
मैं ही क्यों, पल भर न सोच, 
समझ ले तूने इबादत की, 

तेरे दफ्तरों में भी दिखेंगे 
लोग तरह तरह के 
पास जाकर,  छूते होंगे 
काम के बहाने से

देखकर यह अनदेख न कर
उठ खड़ा हो,पकड़ हाथ 
वह सहमी डरी दिखे अगर 
लड़ने में दो उसका साथ

अगर तेरे से वह आगे जाए 
हुनर उसका चमके निखरे 
जलन, ईर्ष्या तुझे न हों
खुलेपन से हार मान ले

हर  वह चिन्ह मिटाने होंगे
जो बताएँ उसको अबला
सृजनहार है नारी जग की,  
निडर, निर्भय वह तो सबला....

हर पुरुष, सिर्फ पुरुष न होकर...
इंसान बने गर जिम्मेदार 
बेखौफ माहौल यहाँ होगा और 
न्यायी होगा यह संसार

(महिलाओं के प्रति हो रहे अन्याय के लिए सिर्फ पुरुष जिम्मेदार नहीं है, पर वह मानसिकता जिम्मेदार है जो हर जगह दिखती है, महिलाओं में भी...)

पंक्ति

Sankalp

 Lets emerge divine power within ourselves ....power to tolerate, power to accept, power to detach our state of mind from situation, power to face,  Power to decide our Karma..

कमलपत्री त्या दव बिंदू सम
अलिप्त राहो तुझे रे मन
बाह्य तरंगा कधी न लागो
तव चित्ताचा ठाव

सागर बनूनी घे तू पोटी 
विकार पिऊनी हास्यच ओठी 
माते सम रे सामावून घे  
भले बुरे ते भाव

प्रवाहातल्या खडकावरूनी 
कितीक लाटा जाती स्पर्शूनी 
ओलावा तो येई क्षण भर  
परी निश्चल राही भाव 

ज्ञान सागरा तोटा नाही...
उघड्या बघ रे दिशा ही दाही
खेळी परी ही तुझ्याच हाती 
तुझाच आहे  डाव

काळाच्या या महासागरी 
वादळ, वारा, लाटा, लहरी
निश्चल आपुल्या मार्गी राहूनी, 
हाक रे धैर्याने तू नाव

एकल नारी

 मैं हूँ एकल नारी 

(गुजरात में 22 लाख एकल महिलाऐं हैं।  मानव सभ्यता के इतिहास में  हम एकल महिलाओं को  सुरक्षित और सम्मानित जीवन क्यों नहीं दे पाते ??..इसपर गौर करने की गुजारिश है यह कविता....)

स्त्री, पुरुष, बच्चे, बूढ़े ...

सब के पीछे मेरी बारी 

नारी में ही अलग मैं "नारी"

मैं हूँ एकल नारी .....


यह कैसी पहचान ओढ़ रखी हैे?  

विधवा, त्यक्ता,  अपरिणीत... 

          अस्तित्व मेरा करना होगा

          क्यों पुरुष-नाम से साबित...?? 

क्यों पुरुष की विधवा

क्यों पुरुष से त्यक्ता 

क्यों पुरुष के बिना अधूरी ।

          यह है एकल नारी.....


जीवन साथी जो गुजरे .....

तो मैं मेहंदी छोड़ूँ ? 

         रंगो से ...किरनो से,

         लहरों से ..रिश्ता तोड़ूँ ....

न झुमका, न छल्ला, न पॉँव में झांझर 

मेले से, जश्न से हो जाऊँ बाहर 

         खुलकर हँसने की भी नही आज़ादी

         मैं न देखूँ मेरेे बच्चों की शादी ...

ऊपर से कहे की "किस्मत की मारी" 

मैं हूँ एकल नारी......


चुड़ैल, डायन ...मुझे कहा ...

बच्चे की बीमारी ..किसी की मौत 

          सब का जिम्मा मुझे मिला... 

          मेरा घर, खेत- खलिहान 

अपनों ने ही लूंट लिया 

घर से बेघर होने की मेरी बारी

        मैं हूँ एकल नारी ....


पिता ने मुझे दान में दिया....

साथी ने किया मेरा त्याग

       "त्यक्ता" कहके समाज ने 

       मेरे से ही माँगा जवाब ....

अरे मैं कोई चीज न हूँ ...

जो बदलो तुम बारी बारी ..

     मैं हूँ एकल नारी.....


अगर नहीं की मैंने शादी 

तो भी है सभी को दिक्कत 

      शक की नजरें..टेढ़े चेहरे ...

      ऊँगली उठाये ...करे जुर्रत

स्वतन्त्र  बनूँ .तो कहे स्वच्छंद...

रीत- भात के फरमान जारी 

मैं हूँ एकल नारी.....


बस करो अब यह सब 

साँस लूँ मैं खुल के अब 

    तू भी मानव मैं भी मानव 

     तेरे मेरे में है इक रब 

प्यार की नरमी, मदद का हाथ 

सम्मान से जी लूँ...

      गर समाज हो साथ ...

      न हो बेबस... न बेचारी ...

भारत की कोई भी एकल नारी....


               पंक्ति

दिल